आई-वडिलांच्या छत्राशिवाय वाढलेला चिमुकला काळाच्या पडद्याआड, खडकपूर्णा कालव्यात बुडून पाचवीतील विद्यार्थ्याचा हृदयद्रावक मृत्यू; आजीचा आक्रोश पाहून गाव सुन्न
अंढेरा :- आधीच आई-वडिलांचे छत्र हरवलेले आयुष्य… आजीच्या कुशीत वाढणारे बालपण… आणि सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत गेलेला निरागस जीव कायमचा निघून गेला. अंचरवाडी येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या स्वराज गणेश खरात या पाचवीतील विद्यार्थ्याचा खडकपूर्णा कालव्यात बुडून झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला सुन्न करून गेला आहे. कलोरा येथील स्वराज हा लहान वयातच आई-वडिलांना मुकला होता. त्याचा सांभाळ त्याची…
