महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांकडून रींगसमध्ये शिवजयंती साजरी

  रींगस / मलकापूर : – कस्ब्यातील प्राचीन श्याम मंदिरात गुरुवारी महाराष्ट्रातील श्यामसर दलाच्या वतीने छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्यामबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात विधीवत पूजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातून आलेल्या नितीन पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दिवाळीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो….

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  मलकापूर :- छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २० फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे, उपप्राचार्य अमोल चोपडे तसेच प्रदीप कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून…

Read More

रणरागिणी महिला फाउंडेशन द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन मुहूर्तावर हळदी कुंकू समारंभ संपन्न

  मुंबई :- रणरागिनी महिला फाउंडेशन, अध्यक्षा सौ.अर्चनाताई साळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गोशाळा मार्ग शाळा क्रमांक १ मुलुंड पश्चिम येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली….

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

  मलकापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे…

Read More

ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली नगरी; “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी भारावले मलकापूर

  मलकापूर ( दिपक इटणारे ) : ढोल, ताशे आणि तुतारींच्या निनादात आसमंत दुमदुमला… पोवाड्यांतून उलगडणारी हिंदवी स्वराज्याची तेजस्वी गाथा… भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेली तरुणाई… आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या गगनभेदी घोषणांनी थरारलेली नगरी! अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा…

Read More

बंद घर फोडून ६४ हजारांची रोकड चोरी; खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : – तालुक्यातील कोलोरी गावात बंद घर फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनाजी अंभोरे (वय २४, रा. कोलोरी) हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर…

Read More

सहीच्या कारणावरून वाद; सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा!

    डोणगाव : – मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे सरपंचांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली आहे. “तू आमचा माणूस नाही” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५, रा. विठ्ठलवाडी) हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता बांधकाम कामगार नोंदणी फॉर्मवर…

Read More

मला पैशांसाठी त्रास देत आहेत; चिट्ठीत उल्लेख, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या!

  खामगाव : – तालुक्यातील वाडी येथे सावकारी व्यवहार व शेती संदर्भातील आर्थिक वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शेतकरी भास्कर लक्ष्मण तायडे (रा. वाडी) यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी…

Read More

ग्राम आळंद येथे पारंपरिक दिंडीने शिवजयंती उत्साहात साजरी

  आळंद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्राम आळंद येथे तरुणांच्या पुढाकारातून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाला फाटा देत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला….

Read More

धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य – ह भ प माधव महाराज पाटील

    मलकापूर :- आजच्या धावपळीच्या युगात जिवन जगणारा आजचा हिंदू हा आपल्या संस्कृती, संस्कार, विचार, आचार, कर्तव्य,धर्म ह्यापासून दूर चाललेला आहे,नोकरी,पैसा,पत्नी,गाडी, बंगला ह्यालाच तो आपलं सर्वस्व समजून बसला पण ज्याला तो सर्वस्व समजून बसलाय त्याला ते सर्वस्व प्राप्त होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि…

Read More
error: Content is protected !!