नगरपालिकेने ‘अभय योजना’ लागू करावी; अन्यथा तीव्र आंदोलन – चेतन अप्पा जगताप यांचा इशारा

मालकापूर: शहरातील सामान्य नागरिकांवरील मालमत्ता कराचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आणि नगरपालिकेची थकीत वसुली पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ‘अभय योजना’ (Amnesty Scheme) लागू करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन अप्पा जगताप यांनी केली आहे. दंडामुळे नागरिक हतबल शहरातील अनेक भागांत गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे. मात्र, या करावर लागणारे व्याज आणि…

Read More

भरधाव दुचाकीची मागून धडक; दोघे जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा; मलकापूरातील घटना

मलकापूर : शहरातील बुलढाणा रोड परिसरात रात्रीच्या वेळी भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीने मागून धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वैभव राजेंद्र वाशीमकर (रा. वृंदावन नगर, मोताळा, ह.मु. माता महाकाली नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे…

Read More

शेतात आंब्याच्या झाडाला गळफास; ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सुनगाव (ता. जळगाव जामोद) : तालुक्यातील सुनगाव येथे एका ३६ वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण प्रल्हाद दामधर (वय ३६, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी २९ मार्च २०२६ रोजी…

Read More

“आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला खलास करून टाकू,” तिघांकडून काठीने मारहाण, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : घरासमोर येऊन शिविगाळ करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी एका व्यक्तीवर काठीने हल्ला करून मारहाण केल्याची घटना वडजी येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राम गुलाब सोनोने (रा. वडजी, ता. मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू; उदयनगर परिसरातील घटना

उदयनगर : उदयनगर – हरणी मार्गावरील बेलासरी शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (३० मार्च) रात्री ही घटना घडली असून मंगळवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनगरपासून काही अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे येथे बिबट्या, अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांची वर्दळ नेहमीच…

Read More

वायर जोडतांना विद्युत धक्क्याने तरुणाचा मृत्यू; देऊळगाव मही येथील घटना

देऊळगाव राजा :देऊळगाव मही येथे इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडताना विद्युत धक्का लागून ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.३० मार्च) सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून बनसोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव मही येथील रहिवासी गणेश आश्रुबा बनसोडे (वय ३७) हे आपल्या घरात वापरात असलेल्या इलेक्ट्रिक…

Read More

आगेमोहळच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे शेतात काम करत असताना आगेमोहळच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढवल्याने एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे आपल्या शेतात…

Read More

खामगावातील ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांचा छापा; कॅबिनमध्ये ३ जोडपी आढळली

खामगाव :- शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेमध्ये शालेय वयातील मुला-मुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान कॅफेमध्ये तीन जोडपी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरातील शेगाव रोड परिसरात असलेल्या ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा…

Read More

वादळी वाऱ्यासह गारपीट; मलकापूर-मोताळा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

मलकापूर :- मलकापूर व मोताळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसासोबत गारांचा मारा झाल्याने मका, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके वादळ आणि…

Read More

चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूतील घटना

मलकापूर : चुलीच्या धुरामुळे त्रास होत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विजय भावराव तायडे (वय २५) रा. काळेगाव ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस…

Read More
error: Content is protected !!