निकालाच्या भीतीने उमलते आयुष्य संपले; साहिलला 60% गुण मिळाल्याची वेदनादायक वस्तुस्थिती
मलकापूर : “उद्या काय निकाल लागेल?” या एका विचाराने त्रस्त झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्याचा धागाच तोडून टाकल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मलकापूर शहरातील आकारेश्वर नगर येथे घडली. आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला साहील संजय राणे हा तरुण निकालाच्या तणावाला हरला… आणि आज त्याला ६० टक्के गुण मिळाल्याचे समोर आले हीच बाब कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळणारी…
