फसव्या कर्जमाफीविरोधातील आंदोलन शेतकऱ्यांच्या अंगलट; १४ जणांवर गुन्हा
मलकापूर : राज्य शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आंदोलन करत स्वतःच्या शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळून निषेध व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून शासनाविरोधातील आंदोलन आता अधिक चर्चेचा विषय ठरले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत १८ जून रोजी वाघुळ शिवारातील काही…
