पहुरजिरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास; सहा महिन्यांत ५ ते ६ घरफोड्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जलंब : येथून जवळच असलेल्या पहुरजिरा येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत गावात ५ ते ६ घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…
