भामट्यानी मंदिरही सोडले नाही! हनुमान मंदिरातून चांदीचे दागिने लंपास, आमसरी येथील घटना!
जलंब:- जलंब पोलीस ठाणे हद्दीतील आमसरी येथे सार्वजनिक हनुमान मंदिरातून मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत ही चोरी घडली असून, एकूण ८२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमसरी येथील कमानीजवळ असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीवर बसविण्यात आलेले चांदीचे दागिने अज्ञाताने…
