पुराच्या पाण्यात तीन म्हशींचा बळी; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान, अचानक आलेल्या महापुराने संसाराचा आधार हिरावला; मडाखेड खुर्द येथील शेतकरी हवालदिल
जळगाव जामोद : डोळ्यांसमोर पाण्याचा लोंढा वाढत गेला आणि काही कळायच्या आत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात अडकली. जीव वाचविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच तीन म्हशी पाण्यात बुडाल्या. या दुर्दैवी घटनेत शेतकरी अशोक रामेश्वर बाराहाते यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पुराच्या पाण्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधारच हिरावून घेतला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड…
