आगेमोहळच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथे शेतात काम करत असताना आगेमोहळच्या मदमाशांनी अचानक हल्ला चढवल्याने एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील शेतकरी सोहम ज्ञानदेव सुरोशे (वय ६५) हे आपल्या शेतात…
