मलकापुरात जनआक्रोश मोर्चाने पालिका प्रशासन हलले; चार महिन्यांत पाणीप्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन!
मलकापूर :- शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नाने संतप्त झालेल्या नागरिकांचा संयम अखेर संपला असून, सोमवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून नगर परिषद कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. “आम्हाला पाणी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील विविध भागांत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे…
