Headlines

vidharbh

माहेरहून पैशांची मागणी; विवाहितेचा छळ, सहा जणांवर गुन्हा, दाताळा येथील घटना

मलकापूर : माहेरहून तब्बल १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा दबाव टाकत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सासरकडील सहा जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ. लक्ष्मी राहुलकुमार देशमुख (वय २७, रा. दाताळा ता. मलकापूर)…

Read More

जुन्या वादाचा राग अनावर; महिलेला दगडाने मारहाण, शेगाव येथील घटना

शेगाव : शहरातील गणेश नगर परिसरात जुन्या वादातून एका महिलेला मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा मंगेश माळी (वय ३७, रा. गणेश नगर) या १४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाकडे जात असताना आरोपी दुर्गा महादेव माळी…

Read More

रेल्वे स्टेशनकडे जाताना युवकाला मारहाण ; जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : शहरात उशिरा रात्री रेल्वे स्टेशनकडे जात असताना एका युवकावर दोघांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिष्णा सुरेश काचकुटे (वय २८, रा. गणपती नगर भाग-१, मलकापूर) हा १४ एप्रिल रोजी रात्री १…

Read More

मुरूमाच्या वादातून महिलेस मारहाण; पाच जणांवर गुन्हा

मेरा बु. : किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या संगीता प्रल्हाद नागरे यांच्या कुटुंबीयांसोबत…

Read More

घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला; संजय नगरात खळबळ, तिघांविरुद्ध गुन्हा

देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरात घरात घुसून एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दे. राजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीनबी इकबाल खान (वय ३६, रा. संजय नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला…

Read More

भीमजयंतीच्या रॅलीनंतर रक्तरंजित शेवट! युवकाचा चाकूने खून; आरोपी फरार

बुलढाणा : भीमजयंतीच्या उत्साहात रंगलेल्या शहरात रॅलीनंतर काही तासांतच एका युवकाचा निर्घृण खून झाल्याने बुलढाणा शहर हादरले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील कैकाडीपुरा परिसरात ही थरारक घटना घडली असून, हल्लेखोर अद्याप फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ येथील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंती रॅलीत सहभागी झाला होता. रॅली संपल्यानंतर रात्री सुमारे…

Read More

मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू

चिखली :- पोलिस स्टेशनच्या होमगार्ड युनिटमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ एप्रिल रोजी दुपारी घडली. आत्माराम उत्तम वखरे (रा. सवणा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम वखरे हे दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास टपाल घेऊन दुचाकीने चिखलीहून बुलढाण्याकडे जात होते. दरम्यान, केळवदसमोरील शेताजवळ ते थांबले असता बुलढाण्याकडून येणाऱ्या एमएच-२८-बीबी-७३६० क्रमांकाच्या…

Read More

घरफोडीत १.७३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी; डोणगावात चोरट्यांचा धुमाकूळ!

डोणगाव :- येथील खंडोबा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी ९ ते १३ एप्रिलदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी डॉ. गजानन प्रल्हादराव पातुरकर हे घराला कुलूप लावून बाहेरगावी…

Read More

शेतातील सौरपंप साहित्याची चोरी; शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

लोणार :- तालुक्यातील देऊळगाव वायसा येथे शेतातील सौरपंपाशी संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेतकऱ्याचे सुमारे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडीबा आश्रुबा सोनुने (वय ४४) यांच्या गट क्रमांक ३१३ मधील शेतात शासनाच्या अनुदानातून सौरपंप बसविण्यात आला होता. २ एप्रिल रोजी संध्याकाळी ते शेतातून घरी परतले होते. दरम्यान…

Read More

क्षणात घेतलेला निर्णय ठरला जीव वाचवणारा! ऑटोला वाचवताना कैरीने भरलेला ट्रक पलटी; हॉटेल सूर्या नजीकची घटना

मलकापूर: वेगात धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत एका क्षणाचा निर्णय किती महत्त्वाचा ठरतो, याचा प्रत्यय आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आला. समोरून येणाऱ्या ऑटोला धडक होऊ नये म्हणून ट्रक चालकाने घेतलेल्या तत्पर निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, मात्र त्याच वेळी कैरीने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. आज पहाटे सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास टाटा मोटर्ससमोर…

Read More
error: Content is protected !!