कर्जाच्या चिंतेतून 73 वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना
खामगाव :कर्जाच्या चिंतेतून ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली ही घटना तालुक्यातील कदमापूर येथे २३ मे रोजी उघडकीस आली. नारायण मुकाजी गुरव यांनी २३ मे रोजी पहाटे घरासमोर टिनपत्राच्या लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा…
