मेहकर तालुक्यात अवैध अफू लागवडीचा पर्दाफाश; १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त

  मेहकर : – तालुक्यातील पांग्री काटे शिवारात सुरू असलेल्या अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीत अंदाजे १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार पोलिसांचे पथक सोमवारी रात्री गस्त…

Read More

जमिनीच्या वाटणीवरून ३२ वर्षीय तरुणाचा खून; वडील-भावावर गुन्हा दाखल!

  लोणार ता. : – तालुक्यातील सावरगाव मुंढे येथे शेतीच्या वाटणीच्या वादातून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडील आणि भावाविरुद्ध लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी फरार आहेत. मृतक कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे) यांच्यात कुटुंबासोबत काही दिवसांपासून शेतीच्या हिस्स्यावरून वाद सुरू असल्याची…

Read More

शेजारील वाद उफाळला; महिलेला मारहाण, जलंब पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा!

  नांदुरा :- तालुक्यातील आंबोडा बरड येथे शेजाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आल्याने एका महिलेला मारहाण झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगला अनिल इंगळे (वय ३४, रा. आंबोडा फाटा, बरड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद…

Read More

नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली; पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू! तिघे जखमी

  चिखली : – चिखली-जालना महामार्गावर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पत्रकार राजेंद्र सुरडकर (वय ३७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. बेराळा (ता. चिखली) येथील रहिवासी असलेले सुरडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह स्विफ्ट डिझायर कारने प्रवास करत होते. मेरा खुर्द ते असोला दरम्यान चालकाचे वाहनावरील…

Read More

मलकापूर तालुक्यातील 20 वर्षीय तरुणी बेपत्ता! मलकापूर ग्रामीण पोलिसांत नोंद

  मलकापूर :- तालुक्यातील सिराढोण येथे २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तुकाराम चहादु राणे (वय ४८) हे १२ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शेतातील काम आटोपून घरी आले होते. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते गुरांना चारा-पाणी करण्यासाठी बाहेर गेले. त्या वेळी त्यांची…

Read More

खडकपूर्णा नदीपात्रात महसूलचा दणका; दोन टिप्पर पोलिसांच्या ताब्यात

  देऊळगाव राजा : – खडकपूर्णा नदीपात्र व धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने पहाटेच्या सत्रात मोठी कारवाई केली. नारायणखेड परिसरात टाकलेल्या धाडीत दोन टिप्परांसह सुमारे सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली असून वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ…

Read More

पोलिस वर्दीचे स्वप्न अपुरेच; सरावादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! आई-वडिलांचा एकुलता एक दीपक काळाच्या पडद्याआड

  मेहकर :- मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी जिद्दीने परिश्रम करणाऱ्या सारशिव येथील १९ वर्षीय दीपक रामदास जाधव याचा धावण्याच्या सरावादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मुंबई पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दीपक नियमितपणे सारशिव फाटा ते मंगरूळ नवघरे परिसरात धावण्याचा सराव…

Read More

परीक्षेला जाताना काळाचा घाला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  चिखली : – चिखली मार्गावरील हातणी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव शंतनू नारायण अंभोरे (वय २३, रा. एकलारा) असे असून तो परीक्षेसाठी जात असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पीएसआय गाढे यांनी पथकासह…

Read More

जमिनीच्या वादातून वरखेड येथे आई-मुलीवर हल्ला; मुलगा-सुनेविरुद्ध गुन्हा दाखल!

  मलकापूर : – जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने उग्र रूप धारण करत वरखेड येथे आई व मुलीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वनमाला प्रल्हाद इंगळे (वय ५५), मूळ रा. वरखेड, सध्या सुरत (गुजरात) येथे वास्तव्यास आहेत. जमिनीच्या वाटणीबाबत चर्चा करण्यासाठी त्या…

Read More

घिर्णी येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता, शहर पोलिसांत हरविल्याची नोंद!

  मलकापूर : – तालुक्यातील घिर्णी येथून एका १८ वर्षीय तरुणीने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. घिर्णी (ता. मलकापूर) येथील रहिवासी गणेश गुणवंत भारती (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी कुं. दिपाली गणेश भारती (वय १८) ही घरात…

Read More
error: Content is protected !!