Headlines

vidharbh

उपचारादरम्यान सुरक्षा रक्षकाचे निधन,जालना येथे मैदान चाचणीत धावताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता तरुण

मेहकर : राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी जालना येथे मैदान चाचणी दरम्यान धावताना पडल्याने गंभीर जखमी सुरक्षा रक्षकाचे १९ ला उपचारादरम्यान निधन झाले आहे. मेहकर तालुक्यातील उकळी येथील ऋषीकेश कैलास चनखोरे (वय २६) हा तरुण मुंबई येथे महाराष्ट्र सुरक्षा दलात ओशिवरा मेट्रो स्टेशन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होता. ११ जुलैला जालना येथे राज्य…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार,एक जखमी, पिंपळगाव काळे फाट्यावरील घटना

बी बी:- साखरखेर्डाः चिखली-मेहकर मार्गावर पिंपळगाव काळे फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा खेमेकर वय (४५) यांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना २४ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. हिवरा आश्रम येथील उमेश अप्पा गणेश अप्पा खेमेकर हे चिखली येथून हिवरा आश्रम येथे…

Read More

कटलरी सामान आणण्यासाठी गेलेली विवाहिता चार वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता, शेगाव येथील घटना

शेगाव:- कटलरी सामान आणण्यासाठी गेलेली विवाहिता चार वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची घटना दि.21जुलै रोजी तेली पुरा भागात घडली आहे, ( आरती प्रमोद माठे,वय 25 वर्ष )( दिशीका प्रमोद माठे,वय 4 वर्षे ) असे बेपत्ता झालेल्या आई मुलीचे नाव आहे. याबाबत प्रमोद विठ्ठल माठे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते शीतला माता मंदिर…

Read More

कोलते अभियांत्रिकी मधील आकाश नारखेडे याची भाभा अणु संशोधन केंद्रात नियुक्ती

मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथील डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आकाश प्रमोद नारखेडे याची भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, मुंबई येथे पोस्ट सायंटिफिक असिस्टंट या पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या उत्तुंग भरारी बद्दल त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात…

Read More

मलकापूरातील कु.सलोनी किरण साळुंके हिची ओडीसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड

मलकापूर :-स्थानिक छत्रपती शिवाजी नगरातील कुमारी सलोनी किरण साळुंके हिची ओडीसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवडझाली आहे. सविस्तर माहिती अशी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये सलोनी हिने 11 वर्षे आतील वयोगटात 200 मीटर फ्रि स्टाईल (2.35.मिनीट) तथा 100 मीटर फ्रि स्टाईल (1.10 मिनिट) प्रथम क्रमांक पटकाविला तसेच 100 मीटर…

Read More

अनोळखी महिलेचा आढळला मृतदेह, घातपाताचा संशय? शवविच्छेदन अहवालानंतर सत्य येणार समोर

साखरखेर्डा : येथील पोलिस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गुंजमाथा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह २४ जुलै रोजी आढळून आला. अडचणीच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. साखरखेर्डा मंडळात गुंज माथा हे उजाड गाव असून, या शिवारात सवडद, साखरखेर्डा, गुंज येथील शेतकऱ्यांची शेती आहे. साखरखेर्डा…

Read More

कोलते इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न

  मलकापूर:- २३ जुलै २०२४ रोजी पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यावर जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे येथील जिल्हा कार्याअध्यक्ष श्री अशोक वानखडे व डोंबिवली येथील अनिस चे कार्यकर्ते श्री…

Read More

अर्थसंकल्पावर इंजि कोमल तायडे काय म्हणाल्या

मलकापूर :- 2024 चा वार्षिक अर्थ संकल्प हा महिला सक्षमीकरणावर भर देणारा आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका बद्दल बोलायचे तर ग्रामीण महिलांना ८१ लाख बचत गटांमध्ये एकत्रित केले आणि या गटांना सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यावर पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या उत्पादक उपक्रम किंवा समूहाची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. तरी गटांमार्फत एकत्रित केलेल्या महिलांना त्यांनी…

Read More

माता महाकाली नगरातील जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष

मलकापूर ( उमेश इटणारे ):- गेल्या महिनाभरापासून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या प्रकाराकडे महिना उलटूनही दुरुस्ती होत नसल्याने पाणीपुरवठा विभाग जाणून दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. माता महाकाली नगर येथील विवेकानंद आश्रम बाजूने गेलेली जलवाहिनी महिनाभरा पासून फुटलेली आहे. या जलवाहिनीतून हजारो लिटर फिल्टर केलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे…

Read More

लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा बदल विवाहित महिलांना दिलासा

( वृतसंस्था )मुंबई:- एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण करण्यात आले. राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे ठरले. त्यानुसार, योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर…

Read More
error: Content is protected !!