प्रभाग रचना बदलामुळे मतदार संतापले; लोकप्रतिनिधींनी सत्तेचा गैरवापर केल्याच्या चर्चेला उधाण; आमचे मतदान कुठं ? नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण
मलकापूर ( उमेश इटणारे ) :- शहरातील नव्या प्रभाग रचनेमुळे स्थानिक राजकारणात भलेमोठे चित्र बदलले असताना नागरिकांमध्ये मात्र गोंधळ, असंतोष आणि संताप यांचे वातावरण आहे. 2016 मधील 14 प्रभागांची रचना यंदाच्या निवडणुकीत 15 प्रभागांवर नेण्यात आली असून या बदलाची पद्धत व पारदर्शकता प्रश्नचिन्हाखाली येत आहे. नव्या रचनेनुसार एकाच घरातील सदस्यांची मते तीन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये…
