कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा :- तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील रामेश्वर विश्वनाथ राहणे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामेश्वर राहणे यांची सहा एकर शेती गट क्रमांक १९८ व १९९ मध्ये आहे. मात्र, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचा खर्चही न निघाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक, को-ऑपरेटिव्ह बँक आणि…
