मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) महाराष्ट्रात सामाजिक समतोल बिघडवल्या जातोय, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जाती-जातीत तेढ निर्माण केली जात आहे. यामुळे नागरिकांना जागे करणे गरजेचे आहे, त्यांचे विचार जपणं गरजेचे आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपली अस्मिता जपत बंधू-भावाने रहावे, यासाठी प्रबोधनच एकमेव मार्ग असून नागरिकांना जागृत करण्यासाठीच जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे सौरभदादा खेडेकर यांनी छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित सभे दरम्यान केले.
मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा- २०२५ मराठा जोडो अभियान रथयात्रेचे मलकापुरात २० एप्रिल रोजी अनेक ह.भ.प. महाराजांच्या उपस्थितीत भजनी मंडळीच्या साक्षीने टाळ-मृदंगाच्या गजरात उत्स्फूर्तपणे स्वागत केले. नांदुरा नाका, जाधववाडी, जिजाऊ फिटनेस क्लब, यशवंत नगर, तहसील चौक, हनुमान चौक आदींसह अनेक ठिकाणी विविध समाजाच्या, राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ ढगे व वेदांगी पाटील यांनी जिजाऊ वंदना म्हणून केली तर नंतर मार्गदर्शनपर सभेचे आयोजन छत्रपती शिवराय मंगल कार्यालयाच्या लॉनवर करण्यात आले होते. यावेळी सभेचे अध्यक्षस्थानी छत्रपती शिवराय मंगल कार्यालयाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख तर प्रमुख उपस्थितीत सौरभदादा खेडेकर, मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात, यांचेसह जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा स्मिताताई बोके, जिल्हाध्यक्षा सिमाताई ठाकरे, इंजिनिअर रविकांत काळवाघे, डॉ.मनोहर तुपकर, प्रा.सुभाष कोल्हे, अनिल अकाळ सर, नंदलाल उन्हाळे, दिलीपराव चौधरी, गजानन पारधी, माजी आमदार राजेश एकडे, डॉ.अरविंद कोलते, कृउबास सभापती संजयभाऊ काजळे, साहेबराव पाटील, संतोषराव रायपुरे, राजूभाऊ पाटील, प्रसादराव जाधव, किशोर नवले, अरूण अग्रवाल, केदारभाऊ एकडे, यश संचेती, वनिताताई गायकवाड, शिवराज जाधव, मंगलाताई पाटील, राजूभाऊ साठे, विजय साठे, दामोधर शर्मा, संजय गावंडे, प्रविण क्षिरसागर, उमेश शिंदे, प्रदीप बिल्हारे, किशोर गारोडे, श्रीकृष्ण उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना सौरभदादा खेडेकर यांनी सांगितले की, अनेक महत्वाचे प्रश्न आ वासून आहेत. जागतिकीकरण, खासगीकरण यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. बेरोजगारीमुळे युवकांचे लग्न होत नसून सामाजिक समतोलही बिघडत असून त्यांची मानसिक अवस्था खराब झाली आहे.ही परिस्थिती बदलविण्याची ताकद जनसामान्यांमध्ये आहे. नागरिकांचे विचार जपण्यासाठी त्यांना मार्गदर्शन गरजेचं आहे. या रथ यात्रेतून नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे मत सौरभदादा खेडेकर यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात दिलीपभाऊ देशमुख यांनी सर्व जाती-धर्मांनी बंधुभावाने राहिल्यास समता नांदेल. यामुळे सर्वांनी एकोप्याने रहावे, असे आवाहन केले.
यावेळी प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा कोमलताई तायडे यांनी मराठा सेवा संघ व या रथयात्रेच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती देत रथयात्रेचा हेतू स्पष्ट केला. व सेवासंघ युगपुरूष पुरूषोत्तम खेडेकर यांनी युवकांच्या हाताला काम असावे यासाठी सदैव आग्रह धरला असून उद्योगी व्हा, अनेकांना रोजगार द्या व सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविण्याची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
तर यावेळी कु.वेदांगी योगेश पाटील हिने सुध्दा मराठा सेवा संघ, संभााजी ब्रिगेडचे कार्य जनसामान्यांच्यासाठीच असून रथयात्रेद्वारे सामाजिक समतोल साधण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. दिंडी सोहळा संभाजी महाराज व संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यावेळी अनुराबाद येथील व म्हैसवाडी येथील जिजाऊ कन्या व मुक्ताई कन्या भजनी मंडळ आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर तायडे, रविंद्र खराटे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश तायडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ रथयात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी व अनेकांनी परिश्रम घेतले.
यावेळी दामोधर शर्मा यांचेकडून यात्रेकरूंना थंड पाणी तर श्यामभाऊ राठी व सुहास (बंडू) चवरे यांच्याकडून शरबतचे वितरण करण्यात आले.
आमदार सिद्धार्थ खरात काय म्हणाले..
यावेळी मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. यावेळी मी मराठा सेवासंघाच्या विचारांचा आमदार असून आज जाती-जातीत सुरू असलेले वाद, दंगली ही भीषण परिस्थिती बदलविण्यासाठी मराठा सेवा संघाचे विचार गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.