मोताळा:- मोताळा परिक्षेत्रात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ५ जानेवारी रोजी किन्होळा शिवारात बिबट्याने भास्कर पंढरी गवई यांच्या वाड्यातील १० बकऱ्या फस्त केल्या. या हल्ल्यामुळे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंस्त्र प्राणी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.