Headlines

वटपौर्णिमेला झाडांच्या रोपट्यांचे वाटप करून इंजि कोमल तायडे यांनी साजरी केली पर्यावरणपूरक वटपौर्णिमा

मलकापूर – श्रध्दा सोबतच आपण २१ व्या शतकात विज्ञानवादी विचार जपणं गरजेचे आहे. प्रत्येक जन्मी हेच पती म्हणून लाभो यासाठी वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात, यावर्षी पासून आपण वडाच्या पूजनासह पती, पत्नी व परिवाराचे निरोगी व दिर्घायुष्यासाठि वृक्ष लागवड व संगोपनाची शपथ घेऊ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ईजि सौ कोमलताई सचिन तायडे यांनी केले.

वटपौर्णिमेचा सन माता भगिनींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या सभोवताली होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अनेकांना श्वासाचे आजारांसह विविध रोग जडले आहेत,तर कित्येकांना जीवही गमवावे लागत आहे,या गंभीर बाबींची दखल घेत ईजि.सौ कोमलताई सचिन तायडे यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून महीलांना झाडांच्या रोपट्याचे वाटप करून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली.
इंजि कोमलताईंनी साजरी केलेल्या पर्यावरणपूरक वटपौर्णिमेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!