मलकापूर: मलकापूरमध्ये श्री सदविचार सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य शिवपुराण कथा अत्यंत भक्तिरसात आणि धार्मिक उत्साहात संपन्न झाली. दि. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या सात दिवसांच्या काळात संपूर्ण मलकापूर शिवमय झाले होते. प्रसिद्ध प्रवचनकार पं. विजयशंकर मेहता यांनी आपल्या अमृतमय वाणीतून शिवमहिमेचे गूढ उलगडले आणि उपस्थित भक्तगण मंत्रमुग्ध झाले.
पहिला दिवस, १३ फेब्रुवारी ला भातृमंडळ, चाळीस बिघा येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेने शिवपुराणाच्या या पावन महोत्सवाची सुरुवात झाली. डमरूचा निनाद, भगव्या पताका आणि शिवभक्तांचा जयघोष यामुळे संपूर्ण मलकापूर भक्तिरसात न्हालले. शोभायात्रेनंतर पं. विजयशंकर मेहता यांनी शिवपुराणाच्या महत्त्वाची ओळख करून दिली आणि भक्तीने जग परिवर्तन कसे घडते, याबद्दल मार्गदर्शन केले.
दुसरा दिवस, १४ फेब्रुवारी ला
या दिवशी पं. विजयशंकर मेहता यांनी शिवतत्त्व म्हणजे काय? त्याचे विज्ञान आणि अध्यात्मातील स्थान याबद्दल सखोल विवेचन केले. भगवान शंकर फक्त विध्वंसक नव्हेत तर ते संहार आणि सृजन या दोन्ही शक्तींचे मूळ आहेत, हे त्यांनी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले.
तिसरा दिवस, १५ फेब्रुवारी ला भक्तीचा परमोच्च आनंद
या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाहकथनाने संपूर्ण शिवधाम भक्तिरसात न्हालले. पं. मेहता महाराजांनी अखंड श्रद्धा, प्रेम आणि संयम यांचा संगम म्हणजे शिव-पार्वती विवाह असे सांगत, भक्तांना गृहस्थधर्म आणि अध्यात्म यातील संतुलन कसे राखावे, याचे मार्गदर्शन केले.
चौथा दिवस, १६ फेब्रुवारी ला
पं. विजयशंकर मेहता यांनी भगवान शंकरांच्या नटराज रूपाचे रहस्य आणि जीवनात संतुलनाचे महत्त्व पटवून दिले. जीवनातील प्रत्येक चढ-उतार हा नटराजाच्या नृत्यासारखा असतो, असे सांगत त्यांनी भक्तांना आपल्या आयुष्यातील संकटांना कसे सामोरे जायचे, याचा मार्ग दाखवला.
पाचवा दिवस, १७ फेब्रुवारी ला रामायण आणि शिवपुराण यांचा अद्भुत संगम
या दिवशी भगवान राम आणि शिव यांचा गूढ संबंध उलगडण्यात आला. “राम हे शिवाचे उपासक होते आणि शिव हे रामाचे” असे सांगत पं. विजयशंकर मेहता यांनी रामायण आणि शिवपुराण यातील विलक्षण संगतीचे रहस्य स्पष्ट केले.
सहावा दिवस, १८ फेब्रुवारी ला भगवान शिव आणि पार्थिव शिवलिंग पूजनाचे महत्त्व
सव्वा लाख पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा या दिवशी उलगडण्यात आला. पं. मेहता महाराजांनी सांगितले की, भगवान शिव हे सहज प्रसन्न होणारे देव आहेत आणि पार्थिव शिवलिंग पूजनाने सर्व बाधा दूर होतात.
सातवा दिवस, १९ फेब्रुवारी ला
अखेरच्या दिवशी पं. विजयशंकर मेहता यांनी कलियुगातील शिवभक्तीचे महत्त्व पटवून देत, “जो शिवाचा दास, त्याचा होतो उद्धार” या वचनाने प्रवचनाची सांगता केली. भक्तांनी हर हर महादेव! च्या घोषात संपूर्ण मलकापूर शिवमय केले.
पं. विजयशंकर मेहता यांचा प्रवचनाचा अनोखा शैली आणि त्यांचा जीवनशैलीवरील दृष्टिकोन यामुळे ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पाकिस्तानसारख्या कट्टर मुस्लिम देशातही भगवद्गीता आणि शिवपुराण प्रवचन दिले आहे. ही बाब त्यांच्या धाडसी आणि अध्यात्मिक उंचीचे प्रतिक आहे. त्यांच्या वाणीने श्रोत्यांना ध्यान, भक्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचे मंत्र मिळाला.
या भव्य शिवपुराण कथेदरम्यान सकाळी यज्ञ आणि पार्थिव शिवलिंग पूजन, दुपारी कथा आणि संध्याकाळी महाआरती असा भक्तिरसात न्हाललेला सोहळा पाहायला मिळाला. हजारो शिवभक्तांनी या भक्तिमहोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचा अनमोल ठेवा वृद्धिंगत केला. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या श्री सदविचार सेवा समितीने अतिशय उत्तम नियोजन केले. पार्थिव शिवलिंग पूजनासाठी पूर्वनियोजन करण्यात आले होते आणि इच्छुक भक्तांसाठी विशेष दानसेवा उघडण्यात आली होती. या सात दिवसांच्या भक्तिरसात मलकापूरने शिवभक्तीचा नवा अध्याय लिहिला. पं. विजयशंकर मेहता यांच्या प्रवचनाने भक्तगणांच्या हृदयात शिवतत्त्व, सकारात्मकता आणि भक्तीचा अमूल्य ठेवा ठेवला.