मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकपूर येथे सविधान दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यामध्ये सक्रिय करण्याचा उद्देश घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या मेडिकल फॅसिलिटी सेल, एनसीसी आणि एनएसएस विभाग तसेच एचडीएफसी बँकच्या सामंजस्य करारांतर्गत जीवन ज्योती ब्लड बँकसाठी ३२ युनिट रक्तदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये संविधानाच्या तत्त्वांबद्दल जागरूकता वाढविणे आणि समाजसेवा या हेतूने रक्तदान हा एक प्रभावी मार्ग म्हणून राबविणे यांचा समावेश होता. महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी तरुणांना आवाहन केले की, संविधान दिन हा केवळ उत्सव न राहता समाजसेवेच्या रूपात साजरा करावा. डॉ. कोलते यांनी विशेषत: तरुणांना संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचा आणि रक्तदानासारख्या उपक्रमातून समाजासाठी योगदान देण्याचा संदेश दिला. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी उत्साहीपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. जयश्री खर्चे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांचे मार्गदर्शन घेत प्रा. ऋतुजा पाटील, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा. मोहम्मद जावेद, एनएसएस अधिकारी प्रा. एस.एम. बोरले आणि लॅब असिस्टंट प्रतीक हांडे यांनी या उपक्रमाला यशस्वीरित्या आकार दिला. विद्यार्थ्यांमध्ये सायली वानखेडे, रितेश चिमणकर, आशिष पाटील, सौरव तायडे, हर्शल घाईट, अदनान शेख सह इतर सर्वांनी एकत्र येऊन रक्तदानाचा उपक्रम आणि संविधान जागरूकता अभियानाला एक अद्वितीय आणि प्रेरणादायक रूप दिले.कार्यक्रमाच्या दरम्यान, रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि धन्यवाद पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे रक्तदानाचे महत्त्व आणि त्याच्या सकारात्मक परिणामाबद्दल उपस्थितांसमोर एक चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात संविधानाची महत्त्वाची भूमिका, त्याच्या मूल्यांची चर्चा करण्यात आली आणि सर्व उपस्थितांना आपले कर्तव्य समजून त्याचे पालन करण्याची प्रेरणा दिली. “आजच्या तरुणांनी राष्ट्रनिर्माणासाठी घेतलेला हा पुढाकार खूप प्रेरणादायक आहे. रक्तदान हा समाजसेवेचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे, जो इतरांच्या जीवनाला आधार देतो. याशिवाय, संविधान दिनानिमित्त समाजाप्रती आपली जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणे हे खूप महत्त्वाचे आहे. या उपक्रमाने तरुण पिढीला सामाजिक, राष्ट्रहितासाठी असलेल्या कर्तव्यानुसार काम करण्याची दिशा दाखवली आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी यावेळी केले.
या उपक्रमामुळे जीवन ज्योती ब्लड बँकमध्ये रक्त साठवण वाढली असून, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे. रक्तदानाची ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया त्याचबरोबर संविधान दिनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे. हा उपक्रम केवळ रक्तदानाच्या उद्देशाने नाही, तर संविधानाच्या तत्त्वांचे पालन, समाजसेवेची भावना आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव देखील वाढविणारा ठरला आहे.युवकांनी संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाजसेवेसाठी योगदान देण्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला, जो इतरांसाठी अनुकरणीय ठरला. या उपक्रमाने केवळ आरोग्य सेवा आणि रक्तपेढीच्या दृष्टीने नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तव्य आणि राष्ट्रीय एकात्मतेबद्दलचे ज्ञान देखील वाढवले.या कार्यक्रमामुळे रक्तदानाचा महत्वाचा संदेश समाजात पोहोचला आहे. यामुळे भविष्यात समाजसेवा आणि कर्तव्यासाठी तरुण पिढी अधिक जागरूक होईल आणि समाजात एक नवा उत्साह निर्माण होईल. संपूर्ण उपक्रमाने मलकापूरमध्ये एक आदर्श घालून दिला आहे, ज्यामुळे संविधान दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ आरोग्याच्या क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक दायित्वे निभावण्यासाठीही प्रेरित करणाराच ठरला आहे. असे वक्तव्य महाविद्यालायचे सदस्य डॉ. गौरव कोलते, श्री. पराग पाटील, श्री. अनिल इंगळे यांनी यावेळी केले.