शेगाव – तालुक्यातील भोनगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून तब्बल ४० कट्टे हरभरा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोनगाव येथील शेतकरी राजेश विलासराव शेळके (वय ४९) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गट क्रमांक ५३६ व ५३७ मधील शेतात रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी रोजी मळणी यंत्राद्वारे काढलेला हरभरा पळमाखाली झाकून ठेवण्यात आला होता. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गट क्रमांक ५३७ मधील ६२ पैकी २५ कट्टे हरभरा, किंमत सुमारे ४० हजार रुपये, चोरी करून नेले. शेळके यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.