
नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा बेजबाबदार कारभार सुरूच; वाकोडी ग्रामपंचायतीप्रमाणे नियोजन कधी होणार?
मलकापूर ( उमेश इटणारे ) – शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांच्या त्रासात वाढच होत आहे. वेळेवर पाणीपुरवठा न होणे, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाणी सोडण्याची पद्धत यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. नगरपालिकेने वाकोडी ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. वाकोडी ग्रामपंचायतीप्रमाणे नियोजन का नाही? वाकोडी ग्रामपंचायत दर चार दिवसांनी नियोजनबद्ध पाणीपुरवठा करते आणि…