मलकापूर शहरात भक्तिरसाच्या सागरात गणरायांचे आगमन! मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी ३२ दातांच्या बोकड अफजलखानाचा वध केल्याचा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करून दाखवला!
मलकापूर ( दिपक इटणारे ): आषाढ संपला… भाद्रपद सुरू झाला… आणि आपल्या आराध्य दैवताचे म्हणजेच गणरायाचे आगमन होताच मलकापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. सकाळीच शहराच्या प्रत्येक गल्लीबोळांत सजावट, रंगीबेरंगी कंदील, विद्युत रोषणाई आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला होता. बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया…’ या घुमणाऱ्या गजरात संपूर्ण शहर…
