आदिवासी बालिकेचा मृत्यू; सातपुड्यात कोवळ्या जीवांची पानगळ कधी थांबणार?
सोनाळा : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा मातृत्वाचा आक्रोश आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे भयावह वास्तव समोर आले आहे. जन्माला येऊन अवघा महिना पूर्ण होण्याआधीच एका निष्पाप आदिवासी बालिकेचा मृत्यू झाला. आईच्या कुशीत खेळण्याआधीच काळाने तिचा घास घेतला. हा केवळ एक मृत्यू नाही, तर आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेला रक्तरंजित ठसा…
