जळगाव खान्देश विवाह सोहळ्यासाठी निघालेले बेपत्ता दाम्पत्यचा सीसीटीव्हीने उलगडला भीषण अपघाताचा सत्यकथन
मलकापूर/नांदुरा:- जळगाव खान्देश येथे नात्यातील विवाह सोहळ्यासाठी आनंदाने निघालेला प्रवास क्षणात काळ बनला. तेलंगणातून कारने निघालेल्या पती-पत्नीचे बेपत्ता होणे, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कारसह दोघांचे मृतदेह सापडणे या संपूर्ण प्रकरणाने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र या भीषण दुर्घटनेचे खरे कारण सीसीटीव्ही फुटेजसमोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तेलंगणातील सूर्यपेठ जिल्ह्यातून…
