Headlines

उपजिल्हा रुग्णालय मलकापूर आणि खासगी रुग्णालयांची मनमानी कारभार; अपघातग्रस्त रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ; केंद्रीय आयुष मंत्रालय यांनी घेतली थेट विदर्भ लाईव्हच्या बातमीचे दखल; ना. प्रतापराव जाधव यांचे निजी सहाय्यक डॉ. गोपाल डीके आयुष ( स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचा पाठपुरावा

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिकाऱ्यांची बेफिकिरी आणि मनमानी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. दि. १२ जानेवारी २०२५ रोजी पिंपळगाव देवी रोडवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे सर्जन ( हाडाचे ) स्पेशालिस्ट डॉक्टर अनुपस्थित होते. रुग्णालयात सर्जन डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णावर सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टर देखील अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. यामुळे अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत आणि दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा अभाव – नेहमीचा प्रकार

मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित राहण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. शासकीय वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहण्याऐवजी बुलडाणा येथून ये-जा करत असल्याने रुग्णालयाचा कारभार ढिसाळ झाला आहे. सर्जन डॉक्टर हजर नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

खासगी रुग्णालये आणि योजनेतील अनास्था..

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत सहभागी असलेल्या मलकापूर शहरातील चार खासगी रुग्णालयांची परिस्थिती देखील तितकीच गंभीर आहे.
1. कोलते हॉस्पिटल
2. चोपडे हॉस्पिटल
3. आस्था क्लिनिक
4. मानस हॉस्पिटल
या रुग्णालयांनी अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध ठेवण्याचे करार केले आहेत. मात्र, रविवारी या रुग्णालयांमध्ये डॉक्टर अनुपस्थित असण्याचे प्रकार वारंवार समोर येतात. यामुळे अपघातग्रस्त किंवा तातडीच्या रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होतो.

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा फटका रुग्णांना

जर कालच्या अपघाताच्या वेळी एकाही रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध असते, तर अपघातग्रस्त रुग्णाचा जीव वाचवता आला असता. शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी वेळेत आणि योग्य प्रकारे सेवा पुरवण्याची जबाबदारी पाळली नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक

मलकापूर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांच्या बेफिकिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे होणाऱ्या रुग्णांच्या जीवितहानीसाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणे अपेक्षित आहे. रुग्णसेवा ही प्राथमिकता असायला हवी, अन्यथा अशा घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास उडेल.

विदर्भ लाईव्हच्या बातमीने प्रकार उघडकीस

12 जानेवारी रोजी पिंपळगाव देवी रोडजवळील आव्हा लिहा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात सर्जन आणि अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयाचा पर्याय निवडला. मात्र, रविवारी मलकापूर शहरात एकही अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला बुलढाणा येथे नेण्यात आले. दुर्दैवाने, योग्य वेळी उपचार न मिळाल्याने रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला. ही गंभीर बाब विदर्भ लाईव्हने आपल्या बातमीतून उजेडात आणली. बातमी प्रसिद्ध होताच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्वरित दखल घेत संबंधित डॉक्टरांकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. या घटनेचा पाठपुरावा करत मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके यांनी तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली. या घटनेने मलकापूरच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या असून, रुग्णांसाठी मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!