( वृतसंस्था )
नवी दिल्ली: ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन’ नुकताच साजरा झाला. या निमित्ताने ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एक महत्त्वाचा हक्क म्हणजे “पसंत न पडलेली वस्तू दुकानदारास परत देण्याचा अधिकार.”अनेकदा दुकानदार “एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही” अशा प्रकारच्या सूचना लावतात. मात्र, असे करणे बेकायदेशीर आहे. ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ नुसार, वस्तू मूळ स्थितीत असल्यास ती दुकानदाराने परत घ्यावीच लागते.जर दुकानदाराने वस्तू परत घेण्यास नकार दिला, तर त्याला दंड भरावा लागतो किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. नुकतेच गुजरात सरकारने याबाबत परिपत्रक जारी केले असून, “विकलेली वस्तू परत घेणे दुकानदारांसाठी बंधनकारक आहे,” असे स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी हा हक्क ओळखून आपल्या गरजा आणि अधिकारांची पूर्णतः जाणीव ठेवावी.