Headlines

पंतप्रधान आवास योजनेतून आणखी तीन कोटी घरे मिळणार,केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सत्तारूढ होताच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारने दहा वर्षांत राबविलेली पंतप्रधान आवास योजना अत्यंत लोकप्रिय ठरली. यापुढे या योजनेखाली आणखी 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय आज, 10 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!