भालेगाव बाजार : भालेगाव बाजार येथील शेतकरी राजाराम वामन घोडके (वय ५०) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ११ जून रोजी घडली. राजाराम वामन घोडके यांनी भारतीय स्टेट बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे शक्य न झाल्याने व पुढील पेरणीचे संकट असल्याने त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेश घोडके यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. भालेगाव बाजार येथे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली.
सततची नापिकी, त्यात बँकेचे 70 हजारांचे कर्ज, 50 वर्षीय शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल
