Headlines

मलकापूर कृषी उत्त्पन बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य, सर्वत्र घाणच घाण, शेतकरी व व्यापाऱ्यांचे हाल.. नागरिकांच्या जीवाशी खेळला जातोय खेळ, संबंधितांनी या गंभीर समस्येवर लक्ष देण्याची गरज..

मलकापूर:- कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वत्र चिखल झाले आहे. त्यात मोठे मोठे पाण्याचे डबके साचल्याने त्यातून चालणे ही कठीण झाले आहे. या चिखलाचा शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे.

याबाबत सविस्तर असे की मलकापूर येथील नांदुरा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीत जवळपास 22 ते 25 व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांकडे शेतकरी जिल्हाभरातून आपला माल विकण्यासाठी आणत असतात तर शहरातील, खेड्यापाड्यातील अंदाजे 400 ते 500 छोटे मोठे भाजीपाला विक्रेते या ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बाजार समिती कमिशन बेस वर पैसे घेत असते घेतलेल्या पैशातून बाजार समितिचा विकास व्हावा व्यापारी व शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी व सुविधा मिळाव्या याकरिता पैसे खर्च केले जात असतात मात्र पाणी तर नाहीच पण चालण्यासाठी स्वच्छ रस्ता सुद्धा नाही. भाजीपाला ठेवलेल्या ठिकाणी आजूबाजूला सर्वत्र घाणच असते. ह्याच फळभाज्या संपूर्ण शहरात तालुक्यात विक्रीला जात असतात यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न उद्भवत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मांगणी जोर धरत आहे. दरम्यान बाजार समितीकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. व्यापाऱ्यांकडून कमिशन बेसवर घेतलेले पैसे कुठे जातात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!