Headlines

बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, नांदुरा येथील घटना!

 

नांदुरा : – नांदुरा शहरातील दुर्गा नगर येथे बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश हरीश भुतडा (वय १८) या युवकाने स्वतःच्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच त्याचे काका राजेश नंदकिशोर भुतडा (वय ५२) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यांच्या तोंडी रिपोर्टनुसार, या आत्महत्येबाबत कोणावरही संशय नाही. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल वानखेडे पुढील तपास करीत आहे. तसेच एएसआय इंगळे, तिडके, संदीप डाबेराव, तसेच ओमसाई फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेने नांदुरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!