मलकापूर :- शहरात दोन दिवसांपासून बंद असलेल्या कचरा गाडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी आणि डेंगूसह साथीच्या आजारांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ही गंभीर बाब ‘दैनिक विदर्भ सत्ता’ने जोरकसपणे मांडली. या बातमीचा प्रशासनाने तातडीने गांभीर्याने घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अखेर कचरा संकलनाची गाडी पुन्हा नियमित सुरु झाली आहे.
कचरा गाडी बंद असल्याने शहरातील रस्ते, गल्ल्या आणि मुख्य भागांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले होते. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. “विदर्भ लाईव्ह’ने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन ही बाब प्रसिद्ध केली होती. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत कचरा गाडी नियमितपणे सुरू असून शहरातील सर्व विभागांतून कचरा संकलन होत आहे.
या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून ‘दैनिक विदर्भ सत्ता’च्या सकारात्मक पत्रकारितेचे कौतुक होत आहे.