मुंबई :- रणरागिनी महिला फाउंडेशन, अध्यक्षा सौ.अर्चनाताई साळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गोशाळा मार्ग शाळा क्रमांक १ मुलुंड पश्चिम येथे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच्या प्रतिमेस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस
हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

हळदी कुंकू समारंभास मुंबई येथील सर्व भाट समाज महिलांनी विशेष सहभाग नोंदविला यामध्ये मुंबई येथील तरुणभारत उपसंपादक कु.योगिताताई साळवी
राष्ट्रीय उपाध्यक्षा ऑल इंडिया सर्वभाट राव संघटन,
व मुंबई भाट समाज अध्यक्षा सौ लताताई बबन साळवी, सौ. आरतीताई सुरेश पवार, सौ मनिषा ताई अभंग,सौ निर्मला ताई जाधव, सौ प्रियाताई खरे, सौ.लक्ष्मीताई जगताप, सौ रेश्मा ताई गायकवाड ,सौ सरलाताई पवार, निर्मलाताई पवार,सौ.आशाताई साळवी व भाट समाजातील असंख्य महिला कार्यक्रमास हजर होत्या.
