मलकापूर:- 19जानेवारी रोजी नरवेल गावात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चव्हाण कुटुंबीय मलकापूरहून काम संपवून ऑटोने घरी जात असताना, नरवेल गावाजवळ त्यांच्या ऑटोला रानडुकराने धडक दिली. या धडकेमुळे ऑटो रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात गणेश चव्हाण (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी रंजना चव्हाण (वय ३५) गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, रस्त्याच्या कडेला फिरणाऱ्या रानडुकरांमुळे या भागात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन रस्ते सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.