Headlines

समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांना ‘संघर्षयोध्दा’ पुरस्कार

 

 

मलकापूर : – भाई अशांत वानखेडे यांचा संघर्ष अन् त्यांनी त्या संघर्षातून समाजासा’ी केलेले कार्य हे अजरामर असेच आहे. अशा व्यक्तीच्या कार्याचा ‘ेवा आपण जतन करणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या कार्याची दखल म्हणून आज सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांचा ‘संघर्षयोध्दा’ हा पुरस्कार देवून सन्मान करीत असल्याचे समस्त बौध्द समाज सत्कार समितीच्या वतीने प्रास्ताविक करतांना समाधान इंगळे सर यांनी सांगितले.
समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांचा समस्त बौध्द समाज सत्कार समितीच्या वतीने १२ एप्रिल रोजी ‘संघर्षयोध्दा’ पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने पुज्य भंते डी.धम्मसरण महाथेरो (अकोला), पुज्य भंते बुध्दरत्न दृष्टीन ध्यान केंद्र संचालक लिहा बु., पुज्य भंते महेंद्रबोधी जामनेर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. सिध्दार्थ मेश्राम हे तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिं.राजा, संतोष शिंदे उपविभागीय अधिकारी मलकापूर, डॉ.पंजाबराव हिरे बालरोग तज्ञ बुलढाणा, राहुल तायडे तहसीलदार मलकापूर, विष्णु झनके भूमिलेख अधिकारी मलकापूर, विजय मोरे उपविभागीय अभियंता जि.प.बांधकाम मलकापूर, आर.एम.सुर्यवंशी जेष्ठ बौध्दाचार्य, अनिल इंगळे उद्योजक, करूणाशिल तायडे पोलिस निरीक्षक मलकापूर, राजेंद्र पवार शेतकरी, विनय ‘मके अतिरिक्त मुकाअ जि.प.अकोला, पी.आर.झनके माजी सैनिक, अ‍ॅड.माणिकराव पवार वकील खामगाव, एन.डी.इंगळे शिक्षक, अशोकराव दाभाडे कामगार नेता बुलढाणा, भगवान इंगळे सामाजिक कार्यकर्ते, संजय जाधव टीव्ही रिपोर्टर बुलढाणा, तोताराम फुलपगारे सर्व सामान्य कामगार, शाहीर विजय वानखेडे कलावंत बुलढाणा, राजेश इंगळे पत्रकार यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे व संतोष शिंदे यांनी भाईंनी केलेल्या संघर्षाबद्दल सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तर तहसीलदार राहुल तायडे यांनी भाईंनी आपल्या जिवनात समाजासा’ी तसेच गोरगरीब, सर्वसामान्यांसा’ी नेहमीच लढा उभारीत त्यांच्या पा’ीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे कार्य हे खरोखरच उल्लेखनीय असेच असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही भाई अशांत वानखेडे यांच्या जिवनावर प्रकाश टाकीत त्यांनी केलेले कार्य, उभारलेला लढा व समाजासा’ी त्यांची नेहमी असलेली धडपड यावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बौध्दाचार्य नितीन सुर्यवंशी खामगाव यांनी तर कार्य परिचय शांतारामजी इंगळे पाली भाषा अभ्यासक, पत्रकार उल्हासभाई शेगोकार यांनी दिला.
कार्यक्रमाला मलकापूर शहरासह परिसरातील गावातील समाज बांधव व स्नेहीजण मो’्या संख्येने उपस्थित होते.

 

*महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत होत मी नेहमी दीन, दलित, शोषित, पीडितांना न्याय देण्याचे काम केले. घेतो जो श्वास आणि खातो तो घास बाबासाहेबांमुळे हा आपला इतिहास आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरीत असे कार्य करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्यातूनच अनेकदा आंदोलने उभारली अन् त्या आंदोलनांमध्ये समाजानेही मो’्या उत्साहाने सहकार्य केले. तर यापुढेही माझे संपूर्ण आयुष्य हे समाजाला न्याय देण्यासा’ीच राहील, याची मी ग्वाही देतो असे सत्काराला उत्तर देतांना भाई अशांत वानखेडे यांनी सांगितले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!