Headlines

मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात धाडसी चोरी, एकाच रात्री तीन ते चार घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर :- शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात एका रात्रीत तीन ते चार घरफोडीच्या घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारी मध्यरात्री १:३० ते २:३० या वेळेत या घटना घडल्या. चोरांनी टप्प्याटप्प्याने घरफोड्या करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सुमारे १.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. एका घरात चोरी करत असताना कुटुंबातील सदस्यांना संशय आला. त्यांनी जागे होताच चोरट्यांनी जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबाच्या आरडाओरडीनंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत शेतीच्या वाटेने फरार झाले. या सतर्कतेमुळे मोठ्या अनर्थ टळला. या घटनांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, टू-व्हीलर, ट्रॅक्टर, शेती अवजारे आणि जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या चोरीच्या घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!