Headlines

पाणी आणायला गेलेल्या 40 वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू!

दुसरबीड : सिं. राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात एका ४० वर्षीय महिलेचा विहिरीत पाण्यात बुड्न मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गजानन भिकाजी उबाळे वय ५५ वर्षे, रा. मलकापूर पांग्रा, यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. सुनीता सदानंद उबाळे वय ४० वर्षे ही महिला २३ ऑगस्ट, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आमच्या मालकीच्या शेता जवळील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याच विहिरीत ती महिला पडून पाण्यात बुडून मरण पावली आहे. या फिर्यादवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन महिलेचे शव उत्तरीय तपासणी करीता सिंदखेडराजा येथील रुग्णालयात नेण्यात आले. शव विच्छेदनानंतर मलकापूर येथे त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सारखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!