( उमेश ईटणारे )
मलकापूर: निवडणुकीच्या तोंडावर मलकापूर मतदारसंघात भूमीपूजनाचा एक नवा गाजावाजा करण्यात आला, पण यामागे निवडणुकीसाठी फक्त दिखाव्या बाजूने काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर अँड रावळ यांनी केलेल्या आरोपांमध्ये ५ वर्षांत जो विकास झाला, तो नगण्यच असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाट्सएपवरून आणि सोशल मीडियावर मतदारांची याबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. नारळ फोडून केल्या गेलेल्या कार्यक्रमात कुठेच प्रत्यक्ष काम सुरू नाही. फक्त गाजावाजा आणि वचनांची छाया आहे. मलकापूरच्या सुशिक्षित मतदारांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे: “विकास असं काहीच नाही, तर त्याला विकास कसा म्हणावा?” मतदारांचा विश्वास चुकवला जात आहे आणि त्यामुळे निवडणुकीत विद्यमान आमदारांना मत पेठीतून धडा शिकवला जाईल, अशी चर्चा जोर धरत आहे.
पुढील भागात बरेच काही..