डोणगाव :- अंत्री देशमुख येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा पैनगंगा नदीपात्रात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल विष्णू मोरे (वय ४२, रा. अंत्री देशमुख) हे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. दररोजप्रमाणे ते मेहकर येथे कामावर जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून गेले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. २० फेब्रुवारी रोजी एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहिम राबवली असता पैनगंगा नदीतील एका डोहाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन, माजी सरपंच संदीप देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास देशमुख, सरपंच ज्ञानेश्वर देशमुख व गावकरी घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.