Headlines

चिखली पोलिसांची मोठी कारवाई : २१ चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत

चिखली : – चिखली पोलिसांनी प्रभावी तपास करून विविध ठिकाणांहून चोरी गेलेले २१ मोबाईल हद्दीतून हस्तगत केले असून, ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही मोठी कारवाई केली. या मोबाईल्सची एकूण किंमत २ लाख ८६ हजार रुपये असून,…

Read More

नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा बेजबाबदार कारभार सुरूच; वाकोडी ग्रामपंचायतीप्रमाणे नियोजन कधी होणार?

मलकापूर ( उमेश इटणारे ) – शहरातील पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांच्या त्रासात वाढच होत आहे. वेळेवर पाणीपुरवठा न होणे, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाणी सोडण्याची पद्धत यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. नगरपालिकेने वाकोडी ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. वाकोडी ग्रामपंचायतीप्रमाणे नियोजन का नाही? वाकोडी ग्रामपंचायत दर चार दिवसांनी नियोजनबद्ध पाणीपुरवठा करते आणि…

Read More

जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट – प्रशासनाच्या आशीर्वादाने भ्रष्टाचाराचा कळस!

मलकापूर:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संपूर्ण पाठिंब्याने जोमाने सुरू असून, प्रशासनाने डोळेझाक करून या व्यवसायाला मोकळीक दिल्याचा आरोप होत आहे. अधिकृत वाईन बार डावलून ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू खुलेआम विकली जात असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाची निष्क्रियता म्हणजे गुन्हेगारांना खुलं आमंत्रण? वाईन बारमधील दारूसाठी ग्राहकांना ₹२५० मोजावे लागत असताना,…

Read More

मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात धाडसी चोरी, एकाच रात्री तीन ते चार घरे फोडली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मलकापूर :- शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. मलकापूर तालुक्यातील घिर्णी गावात एका रात्रीत तीन ते चार घरफोडीच्या घटना घडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारी मध्यरात्री १:३० ते २:३० या वेळेत या घटना घडल्या. चोरांनी टप्प्याटप्प्याने घरफोड्या करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, कपडे आणि इतर मौल्यवान…

Read More

बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, शेगाव येथील घटना!

शेगाव: – येथील बसस्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात राहुल वामनराव इंगळे (वय ४३, रा. चिंचोली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. नातेवाईक व स्थानिकांनी शोध घेऊनही…

Read More

योग्य नियोजनाची कमतरता म्हणूनच ‘कॉपीमुक्त अभियान’ आवश्यक; परीक्षा केंद्रांवर भरारी पथके धाडून ‘कॉपीमुक्ती’चे श्रेय लाटण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

मलकापूर: ( दिपक इटणारे ) सध्या संपूर्ण राज्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असून, शासन आणि प्रशासनाच्या वतीने परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. विविध विभागांच्या भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धडक मोहीम राबवली असून, कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. परीक्षा काळात धाडी – विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही दबावात!…

Read More

घरात शिरलेल्या सापाचा बहीण भावावर हल्ला.. बहिणीचा मृत्यू; भावावर उपचार सुरू!

जालना : – अंबड शहरालगतच्या म्हाडा कॉलनीत शनिवारी (1 मार्च) पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सापाच्या दंशाने 8 वर्षीय श्रध्दा मनोहर खरात हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा 14 वर्षीय भाऊ मकरंद खरात जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोहर खरात हे आपल्या पत्नी, आई आणि पाच मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. अपुऱ्या जागेमुळे कुटुंबातील काही…

Read More

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलीस कर्मचाऱ्याचा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

खामगाव – वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या तयारीत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रसन्न वानखडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. अकोल्यातील आकाशवाणी परिसरात स्थित जलाराम सोसायटी येथे तो आपल्या भावाच्या खोलीत राहत होता. तेथे गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

Read More

धावत्या टाटा मॅजिकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही; रोहिणखेड येथील घटना

रोहणखेड – सुलतानपूर येथून रोहिणखेडकडे साड्या खरेदीसाठी निघालेल्या टाटा मॅजिक वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रोहिणखेडनजीक पाण्याच्या टाकीजवळ ही घटना शनिवार, 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली. वाहनचालक शेख इकबाल शेख हसन हे त्यांच्या मालकीच्या टाटा मॅजिक (MH-17-BX-3283) या वाहनासह जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित गाडी थांबवली व…

Read More

वाकोडीत एसएमएसद्वारे पाणीपुरवठ्याची पूर्वसूचना, शहरातील नागरिक मात्र अंधारात; नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल!

मलकापूर ( उमेश ईटणारे ): – शहरातील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम असून नागरिकांना पाणीपुरवठा कधी होईल याची कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक नागरिकांचे पाणी भरणे राहून जाते. याउलट, अगदी जवळ असलेल्या वाकोडी ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन करून नागरिकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. वाकोडी ग्रामपंचायतीचा नियोजनबद्ध पाणीपुरवठा वाकोडी ग्रामपंचायत नियमित चार दिवसांवर पाणीपुरवठा करते आणि पाणी…

Read More
error: Content is protected !!