
वादळाच्या झटक्यात बोरसे कुटुंबाचे 3 लाखांचे नुकसान; वर्षभराचा शेतमाल आगीत खाक
मलकापूर (देवधाबा):- ज्याच्या घामातून पीक उगवतं, त्याच्या स्वप्नांना आगीचा झटका बसतो, तेव्हा नुसता धूर उडत नाही, तर मनही होरपळून निघतं. दि. 5 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वीज वादळी वाऱ्यामुळे देवधाबा शिवारातील गट क्रमांक 355 मध्ये असलेल्या शेतकरी नारायण रघुनाथ बोरसे यांच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत गोदामात साठवलेला तुर, गहू, तुरीचे कुटार,…