
रेल्वेला आग लागल्याच्या अफवेमुळे उड्या मारलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी.. जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना!
जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून ब्रेक दाबल्यानंतर धुर आणि ठिणग्या निघाल्याने आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. दुर्दैवाने, याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत….