
सर्वस्व राख होऊन गेलं… शेगोकार कुटुंबाचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं; घर, गोठा जळून खाक – एक बैल ठार, दुसरा मरणासन्न – शेगोकार शेतकरी कुटुंब उघड्यावर, तालुक्यातील भाडगणी येथील घटना
मलकापूर ( दिपक इटणारे ):- “आमचं काही उरलं नाही… घर गेलं, पशू गेले, संसार उघड्यावर आला.” अश्रूंना वाट मोकळी करत शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार आपली व्यथा मांडत होते. भाङगणी येथील त्यांच्या शेतमालावर लागलेल्या भीषण आगीत तेव्हा सगळंच जळून खाक झालं. घर, गोठा, अन्नधान्य आणि एक जीव… सर्व काही या आगीत लोपलं. भर दुपारी लागलेल्या आगीने…