ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमली नगरी; “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी भारावले मलकापूर

  मलकापूर ( दिपक इटणारे ) : ढोल, ताशे आणि तुतारींच्या निनादात आसमंत दुमदुमला… पोवाड्यांतून उलगडणारी हिंदवी स्वराज्याची तेजस्वी गाथा… भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेली तरुणाई… आणि “जय भवानी, जय शिवराय”च्या गगनभेदी घोषणांनी थरारलेली नगरी! अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा…

Read More

बंद घर फोडून ६४ हजारांची रोकड चोरी; खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : – तालुक्यातील कोलोरी गावात बंद घर फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनाजी अंभोरे (वय २४, रा. कोलोरी) हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर…

Read More

सहीच्या कारणावरून वाद; सरपंचांविरुद्ध पोलिसांत गुन्हा!

    डोणगाव : – मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे सरपंचांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामपंचायत परिसरात खळबळ उडाली आहे. “तू आमचा माणूस नाही” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५, रा. विठ्ठलवाडी) हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता बांधकाम कामगार नोंदणी फॉर्मवर…

Read More

मला पैशांसाठी त्रास देत आहेत; चिट्ठीत उल्लेख, खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या!

  खामगाव : – तालुक्यातील वाडी येथे सावकारी व्यवहार व शेती संदर्भातील आर्थिक वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत शेतकरी भास्कर लक्ष्मण तायडे (रा. वाडी) यांनी राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी…

Read More

ग्राम आळंद येथे पारंपरिक दिंडीने शिवजयंती उत्साहात साजरी

  आळंद :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्राम आळंद येथे तरुणांच्या पुढाकारातून पारंपरिक पद्धतीने दिंडी काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाला फाटा देत टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गावातील मुख्य मार्गावरून दिंडी काढली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला….

Read More

धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्यकर्तव्य – ह भ प माधव महाराज पाटील

    मलकापूर :- आजच्या धावपळीच्या युगात जिवन जगणारा आजचा हिंदू हा आपल्या संस्कृती, संस्कार, विचार, आचार, कर्तव्य,धर्म ह्यापासून दूर चाललेला आहे,नोकरी,पैसा,पत्नी,गाडी, बंगला ह्यालाच तो आपलं सर्वस्व समजून बसला पण ज्याला तो सर्वस्व समजून बसलाय त्याला ते सर्वस्व प्राप्त होण्यामागे सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि…

Read More

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा! मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : – संत रोहिदासनगर परिसरात जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून दोन जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र भारत पठे (वय २१) हे १७ फेब्रुवारी रोजी घरासमोर उभे असताना आरोपी विशाल रामलाल बछीरे…

Read More

चोरट्यांमुळे दाताळा गाव अंधारात; चोरट्यांनी असं काय केलं?

  मलकापूर :- तालुक्यातील दाताळा शिवारात अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील सुमारे ३००० मीटर लांबीची अॅल्युमिनियम विद्युत तार चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. गावकरी व…

Read More

धाडमध्ये गुंडगिरीला आळा बसणार? आरोपींची पोलिसांकडून धिंड

  बुलढाणा : – धाड परिसरात व्यावसायिकांना धमकावून हप्ता उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आरोपींना सोमवारी गावातील मुख्य मार्गावरून फिरवून कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने हे धाड येथे औषधांचे दुकान चालवितात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते दुकानाकडे जात असताना चौघांनी…

Read More

सकाळी शेतात गेले, रात्री मृतदेह सापडला! ढासळवाडी येथील शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

  पिंपळगाव सराई : – ढासळवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले संतोष दळवी हे घरी परतले नाहीत, त्यानंतर शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे सहा वाजता स्वतःच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत…

Read More
error: Content is protected !!