शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने लावली आग, एक एकर पिक जळून खाक, हजारोंचे नुकसान! मलकापूर शहरातील घटना
मलकापूर, १९ डिसेंबर: दळाचा मारोती शिवारात शेतातील उभ्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे एक एकर तुरीचे पीक पूर्णतः जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, शेतकरी अशोक सूर्यवंशी (पाटील) आणि प्रकाश सूर्यवंशी (पाटील) यांच्या शेतातील उभ्या…
