दशक्रिया विधीदरम्यान मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० जण जखमी!
मेहकर :- तालुक्यातील हिवरा आश्रमजवळील रायपूर परिसरात दशक्रिया विधीसाठी गेलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.8 ) सकाळी घडली. या घटनेत सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील हभप. विठ्ठल महाराज काळे यांचे 27 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते….
